जहाजावर इराणचा हल्ला! 12 खलाशी भारतीय, आखातात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, इराणकडून टोगो देशाच्या केमिकल टँकरवर हल्ला करण्यात आला आहे.

News Photo   2026 04 27T173019.499

इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे जागतिक (War) पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. आखाती देशांमधून येणाऱ्या जहाजांवर निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यामुळे जहाज वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अशातच आता आखातातून मोठी बातमी समोर आली आहे. इराणने 12 भारतीय खलाशी असलेल्या एका तेल टँकरवर हल्ला केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणकडून टोगो देशाच्या केमिकल टँकरवर हल्ला करण्यात आला आहे. या जहाजावर 12 भारतीय कर्मचारी होते. या केमिकल टँकरचे नाव MT Chiron असं असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ओमानमधील शिनासच्या बंदर हद्दीजवळ घडली.

इस्त्रायलने युद्धविराम तोडला! हल्ल्यात संपूर्ण शहर झालं जमीनदोस्त

हे जहाज इतर जहाजांसोबत प्रवास करत असताना इराणी कोस्ट गार्डने त्याला अडवले आणि इशारा म्हणून गोळीबार केला. या घटनेनंतर भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत अशी माहिती नौवहन मंत्रालयाने दिली आहे. गेल्या काही काळापासून इराण आणि अमेरिका यांच्या युद्धबंदीचा निर्णय झालेला आहे. मात्र युद्ध अद्याप थांबलेले नाही. दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे.

इराण आणि अमेरिका अशा दोन्ही देशांकडून एकमेकांना ऑफर दिल्या जात आहेत, मात्र यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये पाकिस्तानात चर्चाही झाली होती, मात्र अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. दरम्यान, इराणने अमेरिकेसमोर एक नवा प्रस्ताव ठेवला आहे.याच सर्वप्रथम होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यात यावी आणि युद्ध संपवण्यासाठी पावले उचलली जावी असे नमूद करण्यात आलं आहे.

अणु कार्यक्रमाच्या मुद्द्यावरची चर्चा नंतर करण्यात यावी असही या प्रस्तावात नमूद करण्यात आलेले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे इराणला आधी तुलनेने सोप्या मुद्द्यांवर सहमती घडवून आणून लवकर करार करायचा आहे आणि त्यानंतर अणु मुद्द्यावर चर्चा पुढे न्यायची आहे अशी माहिती समोर आली आहे.

follow us